Delhi : दिल्लीत उष्णतेची लाट!! राजधानीत ३३ जणांचा मृत्यू, ५० च्या वर तापमान…

Delhi : सध्या देशात पावसाळा सुरू झाला असला तरी राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये भीषण उष्मा कायम आहे. यामुळे याठिकाणी नागरिक हैराण झाले असून नोएडानंतर दिल्लीत भातामुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नोएडामध्ये उष्णतेमुळे नऊ जणांना जीव गमवावा लागला होता. दिल्लीत 12 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस होता. यामुळे याठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोएडामध्ये उष्णतेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, नोएडामध्ये विविध ठिकाणी नऊ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यातील पाच मृतदेहांची ओळख अद्यापही पटू शकलेली नाही. प्रचंड उकाडा आणि उकाडामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे परिस्थितीचा अंदाज येत आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मंगळवारी सेक्टर-125 पेथील खासगी विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचजवळ कचरा गोळा करणा-या तरुणाबा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही, सेक्टर 1 येथील टांकसाळीजवळ सायंकाळी 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. Delhi
अति उष्णतेमुळे बुद्धाचा मृत्यू होण्याची भीती आसपासच्या लोकांना वाटत होती. हे लोक फुटपाथवर आणि रात्रीच्या निवान्यात राहत होते प्राथमिक तपासात उष्माघात त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याने पोलिसांचे मत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.