Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याबाबत उच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, महत्वाची माहिती आली समोर…


Arvind Kejriwal : कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. अटकेनंतरही केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवत आहे. आज दिल्ली कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करावे अशी मागणी एका याचिकेतून केली होती. पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना एक प्रकारे हा दिलासाच दिला आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने नऊवेळा समन्स बजावले होते. त्यांनी ईडी कार्यालयात जाणे टाळले होते. त्यानंतर २१ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याप्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरजित सिंह यादव नावाच्या व्यक्तीने जनहित याचिका दाखल केली आहे. Arvind Kejriwal

अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रिपदावर कायम राहिल्याने कायदा आणि न्याय प्रक्रियेला खीळ बसणार असून, दिल्लीतील घटनात्मक व्यवस्था मोडकळीस येण्याचाही धोका असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. ‘याचिकेत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होत. पण या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव नाही, असं मत न्यायालयाने नोंदवले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!