Ajit Pawar : आता अमोल कोल्हे यांचा विजय शिवतारे होणार? अजित पवार यांनी दिले थेट चॅलेंज, नेमकं काय म्हणाले दादा? जाणून घ्या…

Ajit Pawar पुणे : आगामी काळात शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओपन चॅलेंज दिल आहे. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार अजित पवार यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे.
शिरूर मध्ये आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असून त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणारच.. तुम्ही काळजीच करू नका असे थेट आव्हान अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याच्या चांगल्या चर्चा रंगल्या आहेत.
अजित पवार यांनी सोमवारी अमोल कोल्हे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करून दाखवणार असल्याची गर्जना केली आहे. ज्यांची माझ्यासोबत राहून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी माझ्यासोबत यावे. उगीच दोन्ही बाजूला राहू नये, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या तळ्यात-मळ्यात करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. Ajit Pawar
कोल्हे यांच्या तत्कालीन उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, ’त्यावेळी उमेदवारी देताना योग्य पद्धतीने दिली होती. आम्हाला वाटले होते की, ते वक्ते उत्तम आहेत. उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी चांगली बजावली. ग्रामस्थांना खिळवून ठेवण्याचे काम त्यांनी केले असेही अजित पवार म्हणाले.
यादरम्यान आता त्यांच्या ऐवजी दुसरा बदली उमेदवार देणार का? असे विचारल्यानंतर, तु काळजी करू नको. आजच सांगतो, तिथे दिलेला उमेदवार निवडूनच आणेन असं मिश्कील उत्तरही अजित पवारांनी यावेळी दिले आहे.
अजित पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा संकल्प व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या दोन खासदारांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून पुण्यात जाहीर सभा देखील होणार आहे, याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, पण त्यातल्या एका खासदाराने पाच वर्ष आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असते तर बरे झाले असते. त्यातला एक खासदार एक-दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता माला राजीनामा द्यायचा म्हणून… त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले आहे.
त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा.आता त्यांचे हे सगळं चालले आहे, पण मधल्या काळात ते सहाही मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते . त्यांनी मला आणि त्यावेळचे आमचे वरिष्ठ यांना मी राजीनामा देतोय म्हणून सांगितले होते.
मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमांवर परिणाम होतो आहे. मी काढलेला एक शिवाजी महाराजांवरील सिनेमा चालला नाही. माझा प्रपंच आणि आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो आहे, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, असे ते म्हणाले. यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.