Breaking News : अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण, केली मोठी घोषणा..

Breaking News जालना : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या १७ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत. (Breaking News )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढली. अर्धा तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ३० दिवसांचा वेळ देत असून ३१ व्या दिवशी सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले. आल्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाचही मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. एका एका मागणीवर सविस्तर माहिती दिली. जरांगे पाटील यांनीही त्यांची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आरक्षणात लक्ष्य घालून उपोषण सोडवण्यासाठी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. मला माझा समज प्रिय आहे. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. आरक्षण दिल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत.
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. मराठा समाजासह अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.