उद्यापासून १२ वीची परीक्षा, राज्यभरात कडक नियमावली लागू, ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल…

मुंबई : उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. १० दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, १५ मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले आणि ६ लाख ९४ हजार ३५२ मुली आहेत. तर ३७ ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत.
दरम्यान, या पैकी ७ लाख ६८ हजार ९६७ विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. ३ लाख ८० हजार ४१० विद्यार्थी कला शाखेची तर ३ लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत.