ट्रेलर आला, पिक्चर अजूनही बाकी… ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींचा मोठा इशारा..

नवी दिल्ली : भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ९ तळं उद्धवस्त करण्यात आल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय जवानांनी बदला घेतला.
यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (८ मे) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सरकारी विभागांना आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
लोकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दीर्घ काळासाठी तयारी ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याशिवाय, आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर बारीक लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सरकारी विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढू नयेत, यावर लक्ष ठेवा. लोकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये, यासाठी जनजागृती करा. ‘खोट्या बातम्या’ पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी याच मुद्द्यांवर चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर ही बैठक झाली.
या बैठकीत जवळपास २० सचिव सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या निर्देशांचे पालन करत निर्णय घेण्यास स्वतंत्र असतील. महत्त्वाच्या ठिकाणी आणि पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे गरजेचं आहे. मंत्रालये आणि एजन्सी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. यामुळे काम सुरळीत चालेल आणि संस्था अधिक सक्षम होतील.