त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो, शरद पवारांनी कबुलीच दिली, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ५६ वरून १० जागांवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांसाठी दंड थोपटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान विधानसभेत गाफील राहिल्याची कबुली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
तसेच त्यांनी विरोधकांच्या यशामागे संघाच्या प्रचाराला महत्त्व दिलं आणि म्हणाले की, संघाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला, ज्याचा परिणाम निवडणुकीतील निकालावर दिसला.
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीला दुर्लक्ष केले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. महिलांना ५० टक्के आणि खुल्या गटातील उमेदवारांना ६० टक्के जागा दिल्या जातील, असे पवारांनी यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या पडद्यामागील हालचालींविषयी चर्चा सुरू असून, काही खासदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी सुनील तटकरे यांनी प्रयत्न केले होते. तथापि, या ऑफरला त्या खासदारांनी नकार दिला आहे.