भारताच्या जबरदस्त हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहर याचं कुटुंबच संपलं, भाऊ, बहिणीसह १४ जणांचा केला खात्मा…


नवी दिल्ली : भारतीय लष्करानं पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी तळांवर हल्ला करुन, पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर तर दिलं, पण त्यासोबतच पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांनाही न्याय दिला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली आणि बाग तसंच पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील मुरीदके आणि अहमदपुरा शार्किया इथं नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

बहावलपूर हे मसूद अजहरचं मूळ गाव असून भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये त्याची पत्नी, मुलगी, भाऊ-बहिणींसह संपूर्ण कुटुंब ठार झाल्याचं कळतंय. यानंतर अजहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मीसुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

मसूद अजहर हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक दहशतवादी असून बहावलपूरमध्ये तो मुक्तपणे फिरत असतो. २००२ मध्ये जैश-ए-मोहम्मदला अधिकृतपणे बेकायदेशीत घोषित करण्यात आलं असलं तरी ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं दिसून येतं.

कारण या दहशतवादी संघटनेद्वारे अनेक प्रशिक्षणाची शिबिरं चालवली जात आहेत. १९६८ मध्ये बहावलपूर इथं जन्मलेला अजहर हा एकेकाळी अफगाणिस्तानातील हरकत-उल-मुजाहिद्दीनचा सदस्य आणि धर्मगुरू होता. १९९४ मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात त्याला अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्याला सोडण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!