…म्हणून पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांनाच मारुन टाकलं, माजी मुख्यमंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट


नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगामल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला असून याबाबत कसून तपास सुरू आहे.

या भ्याड कृत्याचा निषेध करत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी दहशतवाद्यांना सज्जड दम दिला आहे. अशोक गेहलोत यांनी या हल्ल्याला ‘अंतरात्मा हादरवून टाकणारा’ असे संबोधले आहे.

त्यांच्या मते, देशात भयाचे वातावरण निर्माण करण्याच्या व्यापक कटाचा हा भाग आहे. पहलगाम हे सीमावर्ती क्षेत्र नसून काश्मीरच्या अंतर्भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अशा ठिकाणी पोहोचून पर्यटकांना लक्ष्य करणे हा देशभरात दहशत पसरवण्याचा दहशतवाद्यांचा दुष्ट हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या हल्ल्यात पुरुष पर्यटकांची हत्या करून त्यांच्या पत्नी आणि मुलांना जिवंत सोडण्यामागे एक क्रूर मानसिकता असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. हा केवळ मृत्यूचा आघात नसून, त्या महिला आणि मुलांसाठी आयुष्यभर सोबत राहणारा एक भीषण मानसिक धक्का आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, एक्स या सोशल मीडिया मंचावर आपली प्रतिक्रिया देताना गेहलोत यांनी लिहिले की, पती आणि वडिलांना कुटुंबाच्या डोळ्यांदेखत निर्दयपणे मारणे, हे एका मानसिक युद्धाप्रमाणे आहे. महिला व मुलांना कधीही न भरून येणारी जखम देण्याचा हा प्रयत्न होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!