भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, छातीवर गोळ्या झेलून…


पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने उत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. या ऑपरेशनमध्ये ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यामुळे पंतप्रधान मोदींनी हा एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होत आहे.

असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैनिकांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक केला.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद! अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान, हे हल्ले पहाटे 1:30 च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये झाले. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना न्याय मिळाला आहे.

या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा भारताने दिला होता. यामुळे पंतप्रधान मोदींनी हा एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!