महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं…

आपल्या देशात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते. तसेच इतर अनेक देखील यादिवशी सुट्टी जाहीर केली जाते. सकाळी शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. आता ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही. यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे. इतर ठिकाणी मात्र सुट्टी असेल.
विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावे. तसेच विद्यार्थ्यंमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर्षीपासून याबाबत आदेश दिले आहेत.
याबाबत एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात असा बदल आपल्याला दिसून येणार आहे.
परिपत्रकामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, या दिवशी ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असेही पत्रकात म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.