Pune Accident News : देवदर्शनाला जात असताना रिक्षा विहिरीत पडून नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, संसार सुरू होण्याआधीच सगळं संपलं..


Pune Accident News पुणे : जिल्ह्यात अपघातांच्या घटनेत वाढ झाली असून, सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे रिक्षा विहरीत पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. (Pune Accident News)

दुर्देवी बाब म्हणजे मृतांमध्ये दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दांम्पत्याचाही समावेश आहे. हा अपघात सोमवार (ता.२५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यातील धायरीहून जेजुरीच्या खंडोबाच्या देवदर्शनाला निघालेली रिक्षा विहिरीत पडल्याने एका तरुणीसह नवदांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे हा दुर्देवी अपघात घडला.

सकाळी व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देवून रिक्षासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे. संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच असा दुर्देवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!