पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय देणारच, पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन..

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दहशतवाद्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. या कठीण काळात १४० कोटी देशवासीयांची एकता हा सर्वात मोठा आधार आहे. पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, असे आश्वासन मोदी यांनी दिला आहे.
‘मन की बात’ या त्यांच्या कार्यक्रमाचा हा १२१ वा भाग आहे. पहलगाम घटनेने देशवासीयांना दुखावले आहे आणि याबद्दल देशवासीयांच्या मनात खोल वेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबियांचे दुःख लोक समजू शकतात. दहशतवाद्यांचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळले आहे.
काश्मीरमध्ये शांतता परतत होती, लोकशाही मजबूत होत होती. पर्यटकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली होती. लोकांचे उत्पन्न वाढत होते, परंतु देशाच्या आणि जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.