पायलट सुमित सभरवाल यांची ४० सेकंदातली समय सूचकता, शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळे वाचले अनेकांचे जीव, नेमकं काय केलं?


अहमदाबाद : याठिकाणी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने देशात मोठी खळबळ उडाली. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेतील मुंबई येथील पवईचे निवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांना जेव्हा लक्षात आलं की आता विमान उंचीवर नेणे अशक्य आहे आणि 304 किमी प्रति तासाच्या वेगाने ते जमिनीकडे झेपावत आहे.

केवळ 600 – 900 फुटाचे अंतर जमिनीशी विमानाच्या टकरावण्याचे बाकी असताना त्यांनी आजूबाजूला नजर फिरवत जिथे कमीत कमी डॅमेज होईल, अशा ठिकाणी ते विमान वळवलं तिथे ते विमान पडलं. यामुळे जमिनीवर दाट लोकवस्तीवर विमान पडून मृत्यूचा आकडा अजून वाढला असता.

तज्ञ सांगतात की जर का पायलट सुमित सभरवाल यांनी घाबरून जाऊन या विमानालाला कुठेही, कसेही पडू दिलं असतं तर 25000 अतिशय दाट लोक वस्तीवर हे विमान कोसळलं असतं मृत्यूचा आकडा भयानक राहिला असता. मात्र त्यांनी कमी वेळेत निर्णय घेऊन हे विमान कमी लोक असतील अशा ठिकाणी पाडलं.

विमानातील अनेकांचे जीव गेले मात्र खाली जमिनीवर असलेल्या लोकांचे जीव त्यांनी वाचवले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आता अजून कारणे शोधली जात असली तरी हा एक मोठा अपघात झाला असून यामध्ये 240 लोकं मरण पावली असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचे देखील निधन झाले आहे. स्वर्गीय सुमित सभरवाल यांना श्रद्धांजली देतानाच त्यांना आपण सलामही केला पाहिजे, त्यांनी दाखवलेल्या या निर्णयामुळे जमिनीवरील लोकांना कमी धोका निर्माण झाला. सध्या याबाबत तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!