उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा ९८.९६ टक्के निकाल; श्रुष्टी शेलार प्रथम..
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.८६ टक्के लागला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
या विद्यालयातील विद्यालयातील ४४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ४३७ विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये ८६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
धक्कादायक! पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात; दोघांविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य भारत भोसले, सर्व पर्यवेक्षक व सर्व अध्यापक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच प्रा. के. डी. बापू कांचन विश्वस्त सचिव सोपान कांचन, राजाराम कांचन, व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी
प्रथम श्रुष्टी सतीश शेलार, ९४.६० टक्के
द्वितीय पूर्वा जगदीश थोरात, ९४ टक्के
तृतीय समृद्धी शरद जाधव ९३.४० टक्के
चतुर्थ तेजस्विनी रामचंद्र ओव्हाळ व आरती विठ्ठल गोसावी ९१.२० टक्के