राज्याला वादळी वाऱ्यासह ‘मुसळधार’चा ऑरेंज अलर्ट, २५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, प्रमुख शहरांमध्ये कसे असेल हवामान?, जाणून घ्या..


पुणे : राज्यभरातील वातावरणात मोठे बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे, आता प्री मान्सूनचे आगमन झाले आहे. अशातच आता १७ मे रोजीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करत राज्यातील २५ जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. राज्यात विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचे वातावरण कायम आहे.

दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

       

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, धाराशिव, अकोला, बीड, नांदेड, लातूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, भंडारा, वाशिम आणि नागपूर या २५ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. विशेषत: दुपारनंतर वातावरण अधिक अस्थिर होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई – कमाल तापमान ३४°से. तर किमान तापमान २६°से. राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील आणि दुपारनंतर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

पुणे – किमान तापमान २३°से. आणि कमाल तापमान ३५°से. राहील. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दुपारी पावसाची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर – किमान २४°से. तर कमाल तापमान ३५°से. राहील. दुपारी किंवा रात्री पावसाची शक्यता आहे.

नाशिक – किमान तापमान २३°से., कमाल तापमान ३५°से. दुपारी ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता.

नागपूर – किमान तापमान २९°से. आणि कमाल ४१°से. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!