आता दप्तराचे ओझे होणार कमी! विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक…

मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. आता याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एकात्मिक पद्धतीने चार भागांत पुस्तके वाटप होणार आहेत.
सर्व विषयांचा एकत्र समावेश असलेले एक पुस्तक तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी असेल. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पाठ्यपुस्तकांतच वह्यांची पानेही दिलेली आहेत.
मोठी बातमी! राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, धमकी देणारा सराईत गुन्हेगार..
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना नव्या रचनेत पुस्तके उपलब्ध झालेली आहेत.
यामध्ये सर्व विषयांच्या तीन-तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली आहे. वर्षभरासाठी एकूण चार पुस्तके आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यासह अन्य महत्त्वाच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ढिगवार, साबीर खान, नारायण अतकरे, केंद्रप्रमुख मनोहर पिकलमुंडे, नरेश पाटील, जगदीशकुमार शिरसाट, अजय बावणे, ज्ञानेश्वर राठोड, गटसमन्वयक धीरज जवळकार, साधनव्यक्ती कलेश कांबळे, शेषराव चव्हाण, रविकिरण खवले, प्रवीण ठाकरे, मिलिंद मोहोड, वैभव गवते, हेमंत कोटंबकर, मनोज शिंगणापुरे, ज्योती राऊत, सविता मळसणे, वैशाली लिलर्व्हे हे काम करत आहेत.
तरुणांना मोठी संधी! पुणे महापालिकेअंतर्गत ५८१ पदांसाठी भरती, जाणून घ्या..
धामणगावरेल्वे तालुक्यात इयत्ता पहिलीचे १०४३, दुसरी १०४९, तिसरी १२०२, चौथी १०६३, पाचवी १२९८, सहावी १२९२, सातवी १४२३, आठवीचे १४४१ पाठ्यपुस्तकाचे संच वितरित करण्यात येणार आहे.