सर्वात मोठी बातमी!! आता सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय…


मुंबई : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे. आता सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत.

त्यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल लागतो, तेव्हा सर्व विद्यार्थी व पालकांची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी धांदल सुरू होते. शैक्षणिक सोडून इतर अनेक कारणांसाठीही दाखले लागतात.

दरम्यान, अशी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते. आता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत. यामुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे दरवेळी पालकांचा होणारा खर्च वाचणार आहे.आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. जातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयांत दाखल कराव्या लागणार्‍या सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!