पंतप्रधान मोदी नव्हे, ‘या’ व्यक्तीने घेतला पाकिस्तानवरील हल्ल्याचा अंतिम निर्णय, आता सगळी माहिती आली समोर…


नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने उत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. या ऑपरेशनमध्ये ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले.

हल्ल्याची वेळ ७ मे २०२५ रोजी रात्री १२:३७ वाजता निश्चित करण्यात आली होती. भारताने ९ ठिकाणांवर एकूण २४ क्षेपणास्त्र डागली आहेत. पण पाकिस्तानवरील इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला नव्हता, तर दुसऱ्या कोणीतरी घेतला होता.

पंतप्रधान मोदींना केवळ हल्ल्याचा संपूर्ण प्लॅन सांगून त्यांच्याकडून मंजुरी घेतली होती. त्यानंतर एका व्यक्तीच्या अंतिम इशाऱ्यानंतर हा हल्ला करण्यात आला होती. हा अंतिम निर्णय कुणी घेतला, ऑपरेशन सिंदूर कधी आणि कसे राबवले गेले? याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊयात.

ऑपरेशन सिंदूर राबवण्याची सुरुवातीची जबाबदारी एनएसए प्रमुख अजित डोभाल यांनी घेतली. डोभाल यांनी एका विशेष पथकासह या ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारली. या ऑपरेशनसाठी एक अतिशय मजबूत टीम तयार करण्यात आली होती. ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यात, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कारवायांबद्दल गुप्तचर माहिती गोळा करण्यात आली. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी जी ठिकाणं बनवली होती, ती सर्व ठिकाणं आयडेंटीफाय करण्यात आली.

यानंतर, ज्या ठिकाणी हल्ले करता येतील, अशी सर्व ठिकाणं निवडण्यात आली. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या सर्व ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवले होते. हल्ल्यासाठी ठोस योजना तयार केल्यानंतर, एनएसए अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींशी व्यापक सल्लामसलत केली. या हल्ल्यात फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर, एनएसए अजित डोवाल यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कोअर टीमसोबत बैठक घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या सूचनांनुसार, हल्ल्याची योजना पुन्हा एकदा अंतिम करण्यात आली. या हल्ल्यात एनटीआरओला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. हल्ल्याच्या अंतिम प्लॅनसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी हल्ल्याला हिरवा कंदील दिला आणि डोभाल यांना अॅक्शन घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर, एका अतिशय लहान गटाला हल्ल्याची माहिती देण्यात आली. तसेच एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या नियंत्रण कक्षाची कमान पूर्णपणे एनएसए अजित डोभाल यांच्या हातात होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!