नवीन बोगदा, मेट्रो आणि बससेवा !! अजित पवारांची महाघोषणा! पुण्यासाठी थेट 2000 कोटींचा प्लॅन, वाहतूक कोंडी कायमची सुटणार..

पुणे : गेल्या वर्षांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. यावर काहीही केलं तरी उपाय निघत नाही. यामुळे पुणेकर याला प्रचंड संतापले आहेत. यामुळे अनेकांनी पुणे शहराला रामराम देखील केला आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी काही निर्णय घेतले आहेत.
अजित पवार यांनी मात्र पुण्यासाठी तब्बल 2000 कोटींची विकास योजना घोषित केली आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काही वर्षात पुणे शहराचा चेहरा मोहरा बदललेल, असे सांगितले जात आहे. यामध्ये पुण्यामध्ये येरवडा भागातून एक नवीन बोगदा तयार केला जाणार असून याच्या साह्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या बोगद्यांमुळे जुने रस्ते सोडून थेट नवीन मार्ग तयार केले जाणार आहेत.
यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचण्यास मदत होणार आहे. तसेच हडपसर ते यवत आणि वडगाव शेरी ते शिक्रापूर या परिसरामध्ये सहा लेन आणि चार लेनचे उन्नत रस्ते तयार केले जाणार आहेत. यामुळे शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. यामुळे अंतर्गत भागात ही वाहने येणार नाहीत.
बाहेरील वाहने बाहेरून गेली तरच वाहतूक कमी होणार आहे. त्यादृष्टीने सध्या नियोजन सुरु आहे. तसेच येणाऱ्या काळात पुण्याच्या मेट्रो मार्गांचा विस्तार देखील केला जाणार आहे व यामध्ये खडकवासला ते खराडी हा नवीन मेट्रो मार्ग मंजूर झाला आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांसाठीचा डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल देखील आता तयार करण्यात आला.
तसेच पुण्यामध्ये एमएसआरडीसी आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून दोन बाह्य रिंग रोड सध्या तयार केले जात आहेत व त्यामुळे शहरातील ट्रॅफिक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पीएमपीएमएलच्या बस वाढवण्यात येणार आहेत. या 1500 बसेस मध्ये इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल.