मराठ्यांच्या लेकराला २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळेल , आपला विजय निश्चित आहे ! दौंड तालुक्यात मनोज जरांगेंच्या सभेला लाखोंचा मराठा समाज सहभागी ..!!


यवत : गेली ७० वर्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक पिढ्या उद्वस्त झाल्या आहेत.सरकारने बुडाखाली झाकून ठेवलेल्या कुणबी नोंदी , दस्तावेज आता कसे आढळू लागले ? असा सवाल करीत मराठा समाजाला २४ डिसेंबर पर्यंत विजय मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटिल यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे -पाटील यांचा तिसऱ्या दौऱ्यातील पहिली सभा वरवंड (ता.दौंड) येथे पारपडली. यावेळी विराट सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते.

 

लढवैय्या नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाची अर्थिक स्थिती सरकारला का दिसत नाही ? ७० वर्षे मराठा समाजासाठी सरकारने काहीच का केले नाही? आमच्या अनेक पिढ्या कुजविण्याचे काम सत्तेत बसलेल्या लोकांनी केले आहे.आज मराठा समाज एकजुटीने आरक्षणासाठी उभा राहिला, तर सरकारची पायाखालची जमीन सरकली आहे. मग तुम्हाला कुणबी नोंदी, दस्तऐवज शोधण्याची आठवण आली काय ? मग समाज एकवटला तर मराठा समाज हा कुणबी आहे, मग हे पुरावे कुठून निघाले आहेत.

 

समित्या नेमलेल्या, आयोग सादर केले पण काम झाले नाही. १८०५ पासून १९६७ आणि १९६७ पासून ते २०२३ पर्यंत न्यायमूर्ती शिंदे समितीने दस्त ऐवज पाहण्याचे काम सुरु केले. लाखाने पुरावे आज सापडले आहेत. मग तुम्ही आरक्षणाचा विचार कधी करणार ? केले आहे. येत्या २४ डिसेम्बरला आम्ही आमचे आरक्षण घेणारच.आता मराठा लेकराच्या तोंडात घास घालण्याची वेळ आली आहे. सरकारने २४ डिसेंबर पर्यंत ओ बी सी मध्ये समाविष्ट करून आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबरला पुढची दिशा ठरवून सांगितले जाईल असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!