Maratha Reservation : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी वाढदिवस साजरा केला म्हणून मराठा भगिनीने व्यक्त केल्या भावना! आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणे समाजभिमुख होते काय?

Maratha Reservation दौंड : सध्या राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. यामुळे राज्यात आंदोलने सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. Maratha Reservation
याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी वाढदिवस साजरा केला म्हणून एका मराठा भगिनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्यांनी राहुल कुल यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केले आहेत. वैशाली बाळासाहेब नागवडे असे या पत्र पाठवणाऱ्या मराठा भगिनीनेचे नाव आहे. सध्या त्यांच्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. Maratha Reservation
वैशाली नागवडे यांनी आपल्या म्हटले आहे की, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणास पांठिबा दर्शविण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, शहरात साखळी उपोषण, आमरण उपोषण, पुढाऱ्यांना गावबंदी अशी तीव्र आंदोलने सुरु आहेत.
आपल्याही दौंड तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरु आहेत. (ता.३०) रोजी आपला वाढदिवस होता. आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मराठा समाजाच्या भावना मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर आज तीव्र आहेत.
आम्हाला दौंडकरांना आपल्याकडून अपेक्षा होत्या कारण आपली एक अभ्यासु व प्रश्नांची जाण असलेला आमदार म्हनून आपली ख्याती आहे असे म्हनतात. परंतु आपण व आपले काही कार्यकर्ते आपला वाढदिवस साजरा करण्यात दंग राहिलात. या गोष्टीमुळे एक मराठा भगिनी हया नात्याने मी तीव्र शब्दात माझी नाराजी व्यक्त करत आहे.
आपला एक समाज बांधव मनोजजी जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी जीवन -मरणाची लढ़ाई लढ़त असताना आपण इकडे आपला वाढदिवस साजरा करीत आहात ही बाब समाजाभिमुख आहे का? कारण आपन आमचे लोकप्रतिनिधि आहात व मराठा समाजाचे पण आहात.
मराठा आरक्षनाला फक्त मराठा लोकप्रतिनिधी नाही तर सर्व समाज बांधव व विविध संघटना, विविध पक्षाचे नेते ही पाठिंबा देत आहेत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आरक्षणासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांबरोबर उपोषणासाठी बसला असता तर आम्हांला दौंडच्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट वाटली असती व आम्हांला त्याचा सार्थ अभिमान वाटला असता.
परंतू आपण समाजहित लक्षात न घेता वाढदिवस साजरा करण्यात मग्न राहिलात. याबाबत मी एक मराठा समाजाची भगिनी या गोष्टीची जाहिरपणे नाराजी व्यक्त करत आहे. पुढचा काळ कसोटीचा आहे, तरी आपन मराठा समाजा बरोबर रहाल ही अपेक्षा, अशी पोस्ट वैशाली बाळासाहेब नागवडे यांनी लिहिली आहे.