Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा, म्हणाले एकदा समाजापुढे या अन्…


Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे. रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला रवाना झाली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला संयम ठेवण्यास सांगण्यापेक्षा आरक्षण देण्यास उशीर का झाला म्हणून, सरकारला धारेवर धरले पाहिजे.

मात्र, ते उलट वागत आहेत. सात महिन्यात ते एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत. त्यामुळे त्यांनी एकदा मराठा समाजासमोर यावे, नेमकी भूमिका मांडावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करू,’ असे आव्हान मनोज जरांगे यांनी अजित पवार यांना दिले.

जरांगे यांची पदयात्रा रविवारी रात्री नगरच्या बाराबाभळी येथील मदरशाच्या मैदानावर मुक्कामाला होती. जरांगे यांनीही मदरासामध्ये मुक्काम केला. मुस्लिमांनी त्यांचे स्वागत आणि सहभागी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविल्या. Manoj Jarange Patil

सकाळी पुढील प्रवासाला निघताना प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, ‘कोणाची अडचण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. मात्र सरकार योग्य प्रतिसाद देत नसल्याने ही वेळ आली. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही.

सरकारने योग्य प्रकारे संवाद करावा, धमक्या, दमबाजी नको. लोकशाहीतील कायद्याला धरून आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषणाची परवानगी मागितली आहे. सत्तेच्या जोरावर कायदा पायदळी तुडविणे सरकारला महागात पडेल, असे मनोज जरांगे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!