Maharashtra Rain : महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस राहणार पाऊस, कधी सुरु होणार थंडी जाणून घ्या…


Maharashtra Rain : राज्यात जवळपास शनिवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असे मत हवामान खात्यातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार ७ डिसेंबर २०२४ पर्यंत केवळ ढगाळलेलेच राहणार असे बोलले जात आहे.

तसेच जर झालाच तर सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे असा अंदाज देण्यात आला आहे.

तसेच, सोमवारपासून म्हणजे (ता.८) डिसेंबर पासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे असेही हवामान खात्यातील तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे. Maharashtra Rain

दरम्यान, सोमवार (ता.८) ते शुक्रवार (ता.१३ )डिसेंबर पर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात किमान तापमान हे पुन्हा १० ते १२ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरू शकतो, असं म्हटलं जात आहे. यामुळे आता हवामान खात्यातील तज्ञांचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group