Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? ८ आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आतली माहिती आली समोर…

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानाला आता काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे प्रचाराला जोर वाढला आहे. राज्यात अनेक बड्या नेत्यांचा सभा होत आहे. अशातच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांना केले आहे. माझ्यासोबत ८ आमदार असून, आम्ही मोठं बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असे एका मंत्र्याने सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. Maharashtra Politics
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या काळात राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि ८ आमदार परत शिवसेना ठाकरे गटात येण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासह ८ आमदार असून आम्ही मोठे बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असे मंत्र्याने सांगितल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलय. तसेच २०१९ नंतर भाजपने ५ प्रमुख चेहरे आयात केले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. एका वृत्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.