Maharashtra Politics : अखेर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला! कोणाला कोणतं खातं मिळणार? जाणून घ्या…


Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या महायुतीला घवघवीत यश मिळाले. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागला असली तरी शपथविधी सोहळ्यासाठी बारा दिवसांचा कालावधी लागला.

त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. त्यामुळे महायुतीमधील घडामोडींसंदर्भात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतिक्षा लागली आहे.

अशातच आता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा प्रस्तावित फॉर्म्युला २२-१२-९ या समीकरणावर आधारित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील सामंजस्य दिसून येते.

भाजप (२२ पदे), १८ कॅबिनेट मंत्री, ४-५ राज्यमंत्रीपद भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्रीपदे भाजपाकडेच राहतील.

शिवसेना (शिंदे गट) (१२ पदे), ९ कॅबिनेट मंत्री, २-३ राज्यमंत्रीपद शिंदे गटाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पदांचा योग्य समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (९ पदे), ८ कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्रीपद अजित पवार गटाला सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना समाधानकारक वाटप करण्यात आले आहे. Maharashtra Politics

दरम्यान, मागील सरकारच्या मंत्र्यांनी स्वतःची खाती आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे खातेवाटपामध्ये फारसे बदल होण्याची शक्यता नाही, काही अपवाद वगळता बहुतेक खाती जैसे थे राहतील.

भाजपाने सर्वाधिक मंत्रीपदे घेत आपले वर्चस्व दाखवले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेले मंत्रीपद वाटप त्यांना शांत ठेवण्यासाठी रणनीतीचा भाग वाटतो. खातेवाटपामध्ये बदल टाळल्याने सहकार्य आणि स्थिरता यावर भर दिला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!