Jitendra Awhad : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्यावर संभाजीनगरात गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?


Jitendra Awhad : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खोटी माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय न्याय संहिता ३५३(२) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता.

यानंतर आत आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Jitendra Awhad

सण उत्सव काळात, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाचा निधी बंद, असे परिपत्रक महसूल वन विभागाने काढलेले नसताना देखील चुकीची माहिती देऊन शासनाची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या विजय भाऊसाहेब काळुंखे या २७ वर्षीय तरुणाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!