महत्त्वाची बातमी! महाबळेश्वर, ठोसेघर धबधब्यासह साताऱ्यातील पर्यटनस्थळे एक महिना बंद राहणार…

महाबळेश्वर : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामुळे याठिकाणी पर्यटकांना जाता येणार नाही. याबाबत आदेश जाही करण्यात आले आहेत.
नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये विविध धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे आणि धरणांचाही समावेश आहे. याठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्हा हा पर्यटकांचा आवडता जिल्हा म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होत असते. या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध लागू केले आहेत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार असला तरी हा महत्वाचा निर्णय आहे.
यामध्ये अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, उरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीतील पर्यटनस्थळे व धरणे अशा स्थळांच्या ही बंदी आहे.
परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते. यासाठी निर्बंध लागू केले आहेत. 20 जूनपासूनच हा आदेश लागू झाला आहे. यामुळे आता पावसाळ्यात बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून अवघड ठिकाणी जातात. यामुळे धक्कादायक घटना घडत असतात.