विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!! अकरावी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार…


पुणे : नुकताच 10 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो.

आता येत्या सोमवारपासून 19 मे 2025 पासून इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर सध्या विविध महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

महाविद्यालयांनी माहिती पोर्टलवर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकृत पोर्टल आणि सूचना यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!