लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू कसा झाला? रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिली महत्वाची माहिती..


मुंबई : मुंब्र्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले. प्रवाशांनी खच्चाखच भरलेल्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. धक्काबुक्की झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी दहा ते बारा प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच मुंबईतील मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती दिली

या घटनेनंतर रेल्वे बोर्डाकडूनकाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतले जाणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल.

दरम्यान, तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!