महाराष्ट्रातील हवामानात होणार अचानक बदल ! ४३ अंशावरुन जोरदार वादळ , पावसाची शक्यता ..!!


Havaman Andaj : महाराष्ट्रातील अनेक भाग सध्या प्रचंड उष्णतेच्या तडाख्यात आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या सगळ्यात वादळी वारे आणि पावसाने राज्यातील काही भागांना झोडपले आहे. कोकण आणि सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला असतानाच, अनेक ठिकाणी उकाड्याच्याही खुणा उमटल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे ढग पसरले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

सिंधुदुर्गातील ओरोस, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ओरोसमध्ये स्थिती सर्वात वाईट होती. येथे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वादळी वाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिंधुदुर्ग भागातील असून, त्यात वादळी वारे सर्व काही उडवून लावत आहेत.

 

वादळी वाऱ्याने विजेचे खांब उन्मळून पडल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. खराब हवामानामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण परिसरात मोठे नुकसान झाले आहे. येथे डेरवण गावातील सुर्वेवाडी, काजरकोंडा, गणेशवाडी येथे अनेक घरांचे नुकसान झाले. शेतात उभी असलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. स्थानिक आमदारांनी अवकाळी पाऊस आणि वादळामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी केली असून प्रशासनाला बाधित लोकांना मदत करण्याची मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!