राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या..


पुणे : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात २० मे रोजी देखील राज्यभरात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

तसेच राज्यभरात ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना यलो तर काहींना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे शेती, आरोग्य आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली.

ऑरेंज अलर्ट – पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग.

प्रमुख शहरांतील हवामान अंदाज..

मुंबई – किमान तापमान 26°C, कमाल तापमान 32°C. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता.

पुणे – किमान तापमान 22°C, कमाल तापमान 31°C. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज.

नागपूर – तापमान 28°C ते 42°C दरम्यान. वीज आणि पावसासह वेगाने वारे वाहतील

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!