राज्यात धो-धो पाऊस कोसळणार! शुक्रवार पासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता…


पुणे : मान्सूनचा ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास शुक्रवार होणार असून १४ जुलैपासून सुरुवात असल्याची माहिती आहे. तसेच कोकणासह उर्वरित राज्यात पाऊस वाढले आहे.

त्यामुळे १७ ते १९ जुलैदरम्यान राज्यात सर्वत्र अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हिमालयापासून मध्य प्रदेशपर्यंत मान्सून जोरदार बरसत असून, ३५० ते १५० मिलिमीटर इतका पाऊस त्या भागात होत आहे.

त्यामुळे त्या भागात पूर आलेला आहे. हा मान्सून ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली असून, अजून तीन ते चार दिवस लागतील, असा अंदाज आहे.

तसेच १४ ते १७ जुलैदरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पाऊस वाढणार आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे.

दरम्यान, १७ ते १९ दरम्यान पाऊस अतिवृष्टीकडे जाईल आणि तो २४ जुलैपर्यंत राहील. कोकणात १७ जुलैपर्यंत मुसळधारचा अंदाज असून, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातही पाऊस वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!