राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सूनबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज…


पुणे : महाराष्ट्रासाठी यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर केला आहे. आयएमडी प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित असून, ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या काळात देशभरात सरासरीच्या १०३% ते १०५% पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन यंदा वेळेआधीच होऊ शकते, असेही संकेत आहेत. साधारणपणे १५ जूनपर्यंत मान्सून देशभरात पोहोचतो, पण यंदा तो लवकर दाखल होऊ शकतो.तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही चांगला पाऊस पडणार आहे.

जूनमध्ये सरासरीच्या ९६% कोकण, गोव्यात अधिक, जुलैमध्ये १०२%, ऑगस्टमध्ये १०८% आणि सप्टेंबरमध्ये १०४% पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीला किंचित कमी पाऊस असला तरी, नंतरच्या महिन्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही अडचण येणार नाही.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे यंदा पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी समाधानी असणार आहे.

दरम्यान, भारतातील सुमारे ६०% शेती पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर दरम्यानचा पाऊस या वर्षी भाताची पेरणी होईल की बाजरी? खते आणि बियाणे खरेदी करावे? कोणत्या कर्जावर व्याज दिले जाईल किंवा नवीन कर्ज घ्यावे लागेल? फक्त ३ महिने पाऊस पडतो तो येत्या १२ महिन्यांत शेतकऱ्याला नफा होईल की तोटा होईल हे ठरवतो. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थमान या पावसावर अवलंबून आहे.

तसेच नैऋत्य मोसमी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. या काळात ५९ टक्के पावसाचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा पाच ते १० टक्के अधिक पावसाचा अंदाज आहे.तसेच म्हणजेच यंदा ९१ सेमी पावसाचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!