लाडक्या बहिणींना २१०० रुपये देता येणार नाही ही वस्तुस्थिती!! आता सरकारमधील मंत्र्याने सगळं खरं खरं सांगून टाकलं..


मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीने केली होती. मात्र तसे काही झाले नाही. आता महायुती सरकार येऊन ६ महिने होत आले तरी याबाबत काहीच निर्णय होत नसून पैसे देखील मिळणार नाहीत असेच सांगितले जात आहे.

आता मंत्री संजय शिरसाट यांनीही याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. यामुळे आता 2100 रुपये मिळणार नाहीत, हे स्पष्ठ झाले आहे. मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला.

त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन वेगवेगळे दावे केले जात असल्याचे दिसून येत आहे. शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

सरकार आल्यानंतर एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार हा प्रश्न तसाच आहे. काही दिवसांपूर्वी सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी २१०० रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले. यामुळे बहिणी नाराज आहेत.

याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, राज्याच बजेट अडीच लाख कोटी रुपयांच आहे. सामाजिक न्याय विभागाला साडे एकोणतीशे कोटी मिळायला हवेत. मला २२ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी ३ हजार कोटी विविध योजनेसाठी ७ हजार कोटी दिले आहेत.

मला केवळ १५ हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील ७ हजार कोटी दुसऱ्या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला ३ हजार कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंर्त्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे. ११. ८ टक्के रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!