शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांच्या तडाखेबंद भाषणाची चर्चा, घोडगंगा कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा, म्हणाले..


शिरूर : तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कामगार सध्या कारखान्यासमोर आंदोलन करत आहेत. यामुळे आता त्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कामगारांचे पगार आणि इतर प्रश्नासाठी सध्या आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनात माजी सभापती मंगलदास बांदल यांनी एक भाषण केले याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, कामगारांच्या या परिस्थितीला कामगारच जबाबदार आहेत.

तुम्ही निवडणूकीला मदत केली. त्यांचे पैसे वाटले, आणि आता तुमच्यावर ही वेळ आली. पण आता त्यांना रस्त्यावर फिरून देऊ नका सर्वात पुढे मी असेल, असेही म्हणत त्यांनी आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांना इशारा दिला आहे.

 

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून कामगार याठिकाणी आंदोलन करत आहेत. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी कोणीही फिरकले नाहीत. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे माऊली कटके यांनी देखील पाठिंबा दिला.

2024 च्या निवडणुकीत तुम्ही त्यांना जागा दाखवून द्या असेही यावेळी बांदल म्हणाले. यामुळे आता येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!