महायुतीत नाराजीनाट्य ; गोगावलेंपाठोपाठ एकनाथ शिंदेहीं कॅबिनेटला अनुपस्थित, चर्चांना उधाण…


पुणे : प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेवर आले असली तरी तिन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटप, निर्णयाधिकारावरून नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत भरत गोगावले यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असणारे भरत गोगावले हे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गैरहजर राहिले. यावर आता भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, आजच्या कॅबिनेट बैठकीला मी अनुपस्थित होतो, काही कामानिमित्त मी दिल्लीत आलो असल्याने कॅबिनेटला जाणे शक्य नाही तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगरला रक्तदानासाठी असल्याने तेही गैरहजर असतील.आमच्यात नाराजी वगैरे काही नाही,सगळं व्यवस्थित सुरू असल्याचं सांगत त्यांनी यावर पडदा टाकला आहे.

दरम्यान रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा निर्माण झाला होता.मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!