Crime News : महिला कॉन्स्टेबलचा पती झाला सैतान; पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, नंतर स्वतः लाही संपवले, समोर आलं धक्कादायक कारण…

Crime News : बिहारमधील भागलपूरच्या पोलीस लाईनमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका तरुणानं हवालदाराच्या पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपीनंही गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस खातंही हादरले आहे.
महिला कॉन्स्टेबल नीतू कुमारी बक्सर येथील असून पती पंकज कुमार आरा जिल्ह्यातील आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता. नीतू लेडी कॉन्स्टेबल म्हणून काम करायच्या. त्यांची ड्युटी नवगचियामध्ये होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची बदली भागलपूरला झाली होती.
भागलपूरला बदली झाल्यानंतर लेडी कॉन्स्टेबल नीतू यांना राहण्यासाठी सरकारी क्वॉर्टर मिळाले होतं. पत्नी नीतू हिला दिलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये बेरोजगार पती पंकज आई आणि दोन मुलांसह राहत होता.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितलं की, नवरा बायकोमध्ये नेहमीच घरगुती कलह सुरू होता. कालांतरानं दोघांमधील भांडणं वाढली. पण नवरा बायकोमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले
पतीनं सर्वात आधी लेडी कॉन्स्टेबल, आई आणि मुलांचा जीव घेतला, त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली. नवरा बायकोमधील वादा विकोपाला गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन एक सुसाईड नोट मिळाली आहे. Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावर एक सुसाईड नोटही आढळली आहे. पोलीस या प्रकरणी कसून तपास करत असून सर्व तपशील तपासात आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हत्याकांडानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचीही तयारी सुरू आहे.