15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही! संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य…


पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांच्या एका विधानामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी देशाची फाळणी झाली होती, असे वक्तव्य केले आहे.

तो काळा दिवस असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते.

15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी भारताची फाळणी झाली. यादिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा असेही भिडे म्हणाले. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असेही ते म्हणाले.

तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीविषयीही आक्षेपार्ह विधानही संभाजी भिडे यांनी केलं आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!