पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत चांद्रयान ३ चा यशस्वी प्रवेश, आतापर्यंत पृथ्वीपासून १,२७,६०९ किलोमीटरच्या कक्षेत प्रवास…

नवी दिल्ली : चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-३ चे १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे.
पृथ्वीभोवती पाच फे-या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आले. यामुळे सध्या सर्वकाही ठीक सुरू आहे.
पाचव्या कक्षेत ढकलण्यात आल्यानंतर काही वेळातच हे चांद्रयान पृथ्वीपासून १,२७,६०९ किलोमीटर बाय २३६ किलोमीटरच्या कक्षेत पोहोचेल. यावर सध्या शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.
इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. यानंतर एक ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. एक ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल.
चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल.