ब्रेकिंग! अखेर छत्रपतीची राष्ट्रवादी-शेतकरी कृती समितीची उमेदवारी यादी जाहीर, अनेक इच्छुकांना मोठा धक्का…

ओंकार निंबाळकर बारामती : येथील इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी आणि शेतकरी कृती समितीने एकत्र येत उमेदवार जाहीर केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक एकत्र आल्याने ही निवडणूक नेमकी कशी होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले होते.
जय भवानी माता पॅनल उमेदवार
गट नं. १ लासुरणे
१ पृथ्वीराज साहेबराव जाचक
२) जामदार शरद शिवाजी
गट नं. २ सणसर
१) निंबाळकर रामचंद्र विनायक
२) निंबाळकर शिवाजी रामराव
गट नं. ३ उध्दट
१) घोलप पृथ्वीराज श्रीनिवास
२) कदम गणपत सोपान
गट नं. ४ अंथुर्णे
१) शिंगाडे विठ्ठल पांडुरंग
२) दराडे प्रशांत दासा
३) नरुटे अजित हरीशचंद्र
गट नं. ५ सोनगांव
१) अनिल सीताराम काटे
२) बाळासाहेब बापूराव कोळेकर
३) संतोष शिवाजी मासाळ
गट नं. ६ गुणवडी
१) कैलास रामचंद्र गावडे
२) सतिश बापूराव देवकाते
३) निलेश दत्तात्रय टिळेकर
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन
१) पाटील अशोक संभाजीराव
अनुसूचित जाती / जमाती
१) मंथन बबनराव कांबळे
९ महिला राखीव प्रतिनिधी
१) सौ. राजपुरे माधुरी सागर
2) सौ. सपकळ सुचिता सचिन
इतर मागास वर्ग
शिंदे तानाजी यादव
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
१) डॉ. श्री पाटील योगेश बाबासाहेब
या 21 जणांना उमेदवारी मिळाली आहे. या कारखाण्याची निवडणूक 10 वर्षांनी होत असल्याने मोठ्या नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. यामध्ये भाजपकडून तानाजी थोरात यांनी देखील पॅनल उभे केले आहे. तसेच सुनील काळे यांनी देखील पॅनल उभे केले आहे. यामुळे आता संध्याकाळपर्यंत अजून कोण कोण माघार घेणार हे लवकरच समजेल.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि जाचक यांची युती पुन्हा एकदा तुटल्याची चर्चा झाली होती. जागा वाटपात मेळ बसत नसल्याने जाचक नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. अखेर याबाबत आता घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता पुढील काळात कारखान्यावर कोणाची सत्ता येणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, आता रंगत वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जावेत यासाठी दोन दिवसापासून इच्छुक उमेदवार यादी जाहीर होईल, असे सांगितले जात होते, मात्र तसे झाले नाही. या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी अगदी काल उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. यासंदर्भात दोन वेळा मुंबईत बैठक पार पडली.