आरक्षणामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची भीती! पक्षाने आखली मोठी रणनीती, चंद्रकांत पाटलांवर दिली ‘ती’ जबाबदारी


पुणे : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेले असताना राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीतुन आरक्षण हवय अशी, भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

अशातच लोकसभा मतदारसंघात किमान दहा हजार मराठा घरांना भेटी देऊन त्यांचे दिलेल्या आरक्षणाबाबत मत तसेच त्यांचा कल जाणून घेण्याच्या सूचना भाजप पदाधिकाऱ्यांसह मित्रपक्षांना दिल्या आहेत. आरक्षणावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर चर्चा करण्यात आली आहे.

शासनाने आरक्षण दिलेले असले तरी जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी मराठा समाजाचा कल जाणून घेतले जाणार आहेत. जे शासनाच्या विरोधात असतील त्यांना शासनाची भूमिका समजावून त्यांचा कल बदलण्याच्या प्रयत्न करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.

पुण्यातील एका आमदाराकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून प्रत्येकी तीन मतदारसंघांचे क्लस्टर तयार करण्यात आले असून पुणे, बारामती तसेच शिरूर मतदारसंघाची जबाबदारी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांनी सोमवारी या तीनही मतदारसंघाच्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना तसेच रिपाई (आठवले गट) चे लोकसभा मतदारसंघाचे प्रत्येकी पाच पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीमध्ये या निवडणुकती विशेष कष्ट घ्यावे लागणार असून, त्यासाठी मित्रपक्षांनी मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांचा उमेदवार असणार आहे. मात्र, ही लढत सोपी नसल्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यासाठी मदतीची आवश्यकता असल्याने मित्रपक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!