सर्वात मोठी बातमी! भारताने बदला घेतला, पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी एअर स्ट्राईक, पाकिस्तान हादरलं…

नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने उत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यामुळे पंतप्रधान मोदींनी हा एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
हे हल्ले पहाटे 1:30 च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये झाले. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना न्याय मिळाला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा भारताने दिला होता.
यामुळे कारवाई करत भारत सरकारने आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकांचा जीव गेला होता. भारतीय वायुसेनेने हे हल्ले करण्यापूर्वी देशभरात 300 ठिकाणी मॉक ड्रिल केले होते. यानंतर, त्यांनी थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारले.
या कारवाईमुळे देशातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त एक लष्करी कारवाई नाही, तर दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कारवाईमुळे भारताने जगाला दाखवून दिले आहे की, दहशतवादाला थारा देणार नाही.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर’बद्दल लवकरच आणखी माहिती दिली जाईल. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.