मोठी बातमी! अखेर भारतीय सैन्यदलाला मोठं यश, 28 दहशतवाद्यांचा केला खात्मा…


नवी दिल्ली : सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं असताना काल युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानकडून मात्र हल्ले सुरूच आहेत. असे असताना मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

असे असताना मात्र सीमा सुरक्षा दलाने तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली. या कारवाईत भारतीय सैन्याने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामुळे ही एक मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार करत असताना पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भारतीय लष्कराकडून जोरदार उत्तर देण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तान पुरता अडकला असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून तीन ते चार महत्त्वाच्या हवाई तळांवर जोरदार हल्ले केले. या कारवाईत रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ हे मुख्य लक्ष्य होतं. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

तसेच मुरीद आणि सुकूर येथील हवाई तळांवरही भारतीय लढाऊ विमानांनी अचूक हल्ले चढवले. यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानकडून हल्ले सुरू आहेत. भारतीय वायूदलाने पाकिस्तानचे तीन प्रमुख हवाई तळ उद्ध्वस्त केल्यामुळे आता या तळांवरून लढाऊ विमाने उड्डाण करू शकणार नाहीत. यामुळे त्यांना अडचणी येणार आहेत.

याचा थेट फटका पाकिस्तानच्या हवाई क्षमतेवर बसणार आहे. युद्धबंदी होऊन काहीच तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने ड्रोनहल्ले करत पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवावी लागणार असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!