Ajit Pawar : …तर विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल!! अजित पवारांच्या आमदाराचे सर्वात मोठं वक्तव्य

Ajit Pawar : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.
महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
तसेच लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सध्या राज्यात चर्चेत आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष त्या- त्या युतीमध्ये निवडणुकी लढणार की स्वतंत्र निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने विधानसभा निवडणूक आणि युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. प्रत्येकाला जर १०० जागा हव्या असतील तर स्वबळावरच लढावं लागेल. तर विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल, असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. Ajit Pawar
काय म्हणले म्हणाले अमोल मिटकरी?
मला असं वाटतं की राष्ट्रवादीने केवळ १०० जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. ५५ जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील. तर त्यात आम्ही समाधानी असू असं नाही. महायुती आणि मविआ म्हणतात आम्ही १०० १०० जागा लढू २८८ मतदारसंघ आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणालेत.
महायुतीमध्ये राष्ट़्रवादीच्या प्रवक्त्याला आवर घालावं, असं वाटत असेल तर मग शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भाजपाचे प्रविण दरेकर असतील यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाने घालावा. चंद्रकांत पाटील आणि माझा फोनवर संवाद झाला.
काल त्यांनी वक्तव्य केलं असता मी त्यांना उत्तर मागितलं की तुमच्या वेळी छुपा राजाश्रय होता का? मग त्यांनी मला फोनवर सविस्तर सांगितलं आणि महायुतीमध्ये विसंवाद नको. आपण तिन्ही एकत्र असावा, असं सांगितल्याचं अमोल मिटकरी म्हणाले आहे.