Ajit Pawar : राज्यात एनडीएची कामगिरी कुठं बिघडली? अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगितले खरं कारण..


Ajit Pawar : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.

महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

त्यानंतर पक्षातील खराब कामगिरीची चर्चा सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा हे खराब कामगिरीचे एक कारण असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी शुक्रवारी कबूल केले की, पक्षाच्या खराब कामगिरीचे प्रमुख कारण म्हणजे कांद्याला मिळणारा कमी भाव आणि अन्य संबंधित मुद्द्यांवरून शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष.

दरम्यान, निवडणुकीत कांद्याच्या भावाने महत्त्वाची भूमिका कशी बजावली यावर चर्चा करताना अजित पवार म्हणाले की, नाशिक आणि राज्यातील इतर कांदा उत्पादक भागात शेतकऱ्यांच्या नाराजीची किंमत शिवसेना (शिंदे गट) – भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला चुकवावी लागली. Ajit Pawar

मात्र, त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीन दिवसांपूर्वी हीच बाब मान्य केल्याने शेतकऱ्यांची नाराजी युतीला जड झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!