Ajit Pawar : वारं फिरलं! विधानसभा निवडणुकांआधी अजित पवारांना पहिला धक्का, बडा नेता अजितदादांची साथ सोडणार…


Ajit Pawar : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आता विधानसभा निवडणुकांआधी पुन्हा एकदा त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहिती नुसार, कोल्हापूरातील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील हे महायुतीला राम राम ठोकणार असल्याचं बोलले जात आहे. तसे स्पष्ट संकेत माजी आमदार के पी पाटील यांनी दिले आहेत.

कोल्हापूरातील बिद्री कारखान्यावरील कारवाई नंतर अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील आक्रमक झाले आहेत. बिद्री कारखान्यावर राजकीय हेतूने कारवाई झाल्याचा आरोप करत माजी आमदार के पी पाटील यांनी मौन सोडले. Ajit Pawar

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला. आबिटकर यांनी कारखान्याच्या प्रगतीत खोडा घातल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. मी आता निवडणूक रिंगणात त्यांच्या विरोधात उतरणार असल्याचंही आव्हान पाटील यांनी दिले आहे.

दरम्यान, बिद्री कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याने के पी पाटील आक्रमक झाले आहे. लवकरच मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं ते म्हणाले.

यापूर्वीही माझ्यावर असा प्रसंग आला होता. जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. माझा पक्ष आणि चिन्ह जनता आहे, असं सांगेत पाटील यांनी महायुती सोडण्याचे संकेत दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!