पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानीमध्ये धाकधूक वाढली, एअरफोर्सही घाबरली, घेतला मोठा निर्णय…


जम्मू काश्मीर : काश्मीरच्या पहलगामल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला असून याबाबत कसून तपास सुरू आहे. लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

यामध्ये पाच दहशतवाद्यांनी तब्बल 40 ते 50 राऊंड फायर केले. यावेळी दहशतवादी गोळ्या घालण्यापूर्वी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारत होते. अनेक जोडप्यांपैकी केवळ पुरुषांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आणि महिलांना सोडून दिले आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. असे असताना आता भारताकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये अलर्ट जारी केला आहे. यामुळे पाकिस्तान घाबरल्याचे दिसून आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दल अलर्ट मोर्डवर गेले आहे. पाकिस्तानी वायू दलाला सावध आणि अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने सध्या भारताच्या सीमेलगत सातत्याने गस्त घालताना दिसत आहेत. भारताकडून देखील लक्ष दिले जात आहे.

भारताकडून बालाकोटप्रमाणे पुन्हा एकदा एअरस्ट्राईक होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सावध हालचाली सुरु आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात या ठिकाणी तणावाचे वातावरण राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!