लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेंची सर्वात मोठी घोषणा…


Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. सध्याही ते एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत बिचुकलेंनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. सातारा लोकसभा निवडणूक मी लढणार असून उदयनराजे यांना दुसऱ्या पक्षामध्ये जायची काय गरज आहे?

त्यांना दिल्लीला जावं लागत आहे हे खूप दुर्देवं आहे. ज्या भाजपवाल्यांनी जय भवानी जय शिवाजीला विरोध केला त्या भाजपसोबत ते का गेले आहेत? महायुतीचा तिढा मी सोडवणार आहे”, असाही दावा अभिजीत बिचुकलेंनी केला आहे.

अजित पवार यांना आगामी निवडणुकीत फक्त २ ते ३ जागा मिळतील. अमित शहा हे गुजराती उद्योजक असून इतर सर्व त्यांचे चाकर आहेत. उदयनराजे माझे बंधू आहेत, होते आणि राहणार. मी अनेक निवडणुका लढल्या आहेत.

छत्रपती हे छत्रपती आहेत, त्यांचं इकडं तिकडं फिरत आहेत ते मला पटत नाही,” असे अभिजीत बिचुकलेंनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!