बारामती तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून, धक्कादायक कारण आले समोर…

बारामती : बारामती तहसील कार्यालयातील आवारात धक्कादायक घटना घडली. शेत जमिनीच्या वादात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्याने पेटवून घेतले आहे.
इंदापूरमधील रेडणी येथील शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या शेतकऱ्याचे नाव रोहिदास माने असे असून तो शेतकरी इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. शेतकऱ्याने शेतीच्या वादासंदर्भात पोलिसांकडे दाद मागितली होती.
असे असताना मात्र त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. तक्रार करुनही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई केल्याने या शेतकऱ्याने थेट पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बारामतीमध्ये मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, रोहिदास माने यांनी यापूर्वी उपोषण केले होते. असे असताना मात्र त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.